पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या ‘त्या’ 1109 दिंड्यांना मिळणार अनुदान; सरकारच्या आदेशात नेमकं काय?

पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या ‘त्या’ 1109 दिंड्यांना मिळणार अनुदान; सरकारच्या आदेशात नेमकं काय?

Ashadhi Wari 2025 : महाराष्ट्रातील वारकऱ्यांची पावलं आता पंढरीच्या (Ahsadhi Wari 2025) दिशेने पडू लागली आहेत. गावोगावीच्या दिंड्यांना पंढरीला निघण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. या दिंड्यांमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांसाठी (Pandharpur News) आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीनिमित्त मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रति दिंडी 20 हजार रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2024 करता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याचे आदेश दिले होते. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुदान देण्याचे निर्देश होते. सन 2023-24 मध्ये विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारला 1109 दिंड्यांची यादी पाठवण्यात आली होती. आता याच पद्धतीने यंदाही राज्य सरकारकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून मानाच्या दिंड्या विठूरायाच्या जयघोषात पंढरीत दाखल होतात. या दिंड्यांबरोबरच गावोगावच्या अनेक लहान मोठ्या दिंड्या सोबत येत असतात. या दिंड्यांसोबत लाखो वारकरी ऊन वारा पाऊस सहन करत पंढरीत येतात. या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी औषधोपचार, आरोग्य तपासणी, पिण्याचे पाणी यांसारख्या व्यवस्था केल्या जातात. आता राज्य सरकारनेही या दिंड्यांसाठी मदतीची भूमिका घेतली आहे. त्यानुसार मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रती दिंडी 20 हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.

कोरोना, वारकरी निधी ते विमान अपघात; अजितदादांनी एक-एक मुद्दा क्लिअर केला

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनांनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे चरणसेवा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांत आरोग्य तपासणी, उपचार आणि चरणसेवा करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणीच चरणसेवा दिली जात आहे. वैद्यकीय तपासणी केंद्रांच्या माध्यमातून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

दिवे घाटाची रूंदी वाढवणार

आता पाऊस दरवर्षापेक्षा जास्त पडला आहे. जेव्हा पाऊस चांगला पडतो, तेव्हा आमचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर येतोच. परंतु आमचा शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर येतो. त्यांच्या पेरण्या वैगेरे उरकलेल्या असतात, त्यामुळे त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काल दिवे घाटात पाऊस पडला, पाणी साचलंय. साईट गटारात साचलेलं पाणी रस्त्यावर आलंय. तर त्यामध्ये आम्ही गंभीरपणे या गोष्टी घेतल्या आहेत. दिवे घाटात काम चाललं आहे. दिवे घाट सात मीटर रूंदीचा आहे, आता तो 21 मीटर रूंदीचा आपण करत आहे. यावर्षी काम पूर्ण होणार नाही. पण यावर्षी वारकऱ्यांना दिवे घाट चढताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

दिवाळीनंतर उडणार राजकीय धुराळा! निवडणूक तयारीचा मुहू्र्त ठरला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube